सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४

आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे

 आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !



एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो

जो जातो तो सुटतो , परीक्षा असते मागे राहणाऱ्याची 

कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत 

जो मागे रहातो त्याला आठवणी येणं , अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं !

आता प्रश्न असा असतो की ही आसवं हे रडणं थांबवायचं कुणी ? 

मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ?

पाठीवरून हात कुणी फिरवायचा ?

निश्चितपणे ही जवाबदारी असते मुलांची , मुलींची , सुनांची ....

थोडक्यात काय तर

दोघांपैकी एकजण गेल्यानंतर

मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडिल होता आलं पाहिजे !

लक्षात ठेवा लहानपणी आई वडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात

आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात

स्वतः उपाशी राहून , काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात

परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात


म्हणून आता ही आपली जवाबदारी असते , त्यांच्या सारखच निस्वार्थ प्रेम करण्याची

असं झालं तरच ते जगू शकतील 

नसता " तो माणूस म्हणजे वडील " किंवा " ती स्त्री म्हणजे आई " तुटून जाऊ शकते , कोलमडून पडू शकते !


आणि ही जवाबदारी फक्त मुलं , मुली आणि सुना यांचीच असते असे नाही 

तर ती जवाबदारी प्रत्येक नातेवाईकाची , परिचिताची , मित्र मैत्रिणींची .......सर्वांची असते !


फक्त छत , जेवणखाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरंच ही माणसं जगू शकतील !


आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय ? हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं ......म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या !

केवळ माया , प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा 

त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या !

उद्या हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो 

म्हणून नेहमी सर्वांशी प्रेमाने,मायेने आणि आपुलकीने वागा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती सराव पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दीमत्ता

इयत्ता चौथी - इंग्रजी व बुद्धिमत्ता सराव चाचणी मोफत शिष्यवृत्ती टेस्ट सीरीज पेपर क्र. २...